Skip to main content

महाराष्ट्र राज्यातील उपयुक्त जलसाठा असलेली ५ धरणे

 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील उपयुक्त जलसाठा असलेली ५ धरणे पाहणार आहोत 


1 कोयना धरण




नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे कोयना धरण


कोयना धरण भारतातील सर्वातज्यास्त वीजनिर्मिती करणारे धरण आहे

तसेच हे धरण महाराष्ट्रातील सर्वातज्यास्त उपयुक्त पाणीसाठा असलेले धरण आहे 

आणि कोयना हे धरण महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण देखील आहे 


हे धरण पाटण तालुक्यातील कोयनानगर गावाजवळ आहे


कोयना हे धरण सातारा शहरापासून 84 किलोमीटर अंतरावर आहे

हे धरण पाटण शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर आहे


कोयना हे धरण कृष्णेची उपनदी कोयना ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे 


ह्या धरणाचे बांधकाम 1956 ते 1964 मध्ये पूर्ण करण्यात आले 


कोयना याधरणाची उंची 103.2 मीटर  म्हणजे 339 फूट आहे 

या धरणाची लांबी 807.2 मीटर  म्हणजे 2648 फूट आहे 

कोयना या धरणाची पाणी साठवण्याची  एकूण क्षमता 105.26 टीएमसी 

म्हणजेच 105260 दशलक्ष घनफूट इतकी आहे


कोयना या धरणाची पाणी साठवण्याची उपयुक्त क्षमता 100.14  टीएमसी 

म्हणजेच 100140 दशलक्ष घनफूट इतकी आहे


या धरणाला 6 दरवाजे आहेत 


या धरणाच्या जलाशयाला शिवसागर जलाशय असे म्हणातात

कोयना याधरणावर 20 मेगावॉट चे 2 टर्बाईन 

70 मेगावॉट चे 4 टर्बाईन

75 मेगावॉट चे 4 टर्बाईन

80 मेगावॉट चे 4 टर्बाईन

250 मेगावॉट चे 4 टर्बाईन

असे एकूण 10

टर्बाईन बसवलेले आहेत त्यावरून एकूण 1960 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा सध्याचा पहिल्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे 

तेहरी प्रकल्प जेव्हा पूर्ण क्षमतेने काम करेल तेव्हा कोयना २ ऱ्या क्रमांकावर येईल

नेहरू मेमोरियल पार्क

प्रकल्पाचे काम पूर्णत्वाच्या जवळ असताना 10 एप्रिल 1960 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी कोयना प्रकल्पाला भेट दिली. या कार्यक्रमाच्या स्मरणार्थ कोयना धरणाच्या उजव्या बाजूच्या टेकडीवर त्यांच्या कृपाळू हस्ते एका झलकचे अनावरण करण्यात आले. या प्रकल्पामुळे हे ठिकाण आणि हा कार्यक्रम एक सुंदर उद्यान बांधून त्याला "नेहरू मेमोरियल पार्क" असे नाव देण्याची कल्पना आली. हे उद्यान पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या बागेतून धरणाचे वरच्या बाजूचे दृश्य दिसते. 'यशोगाथा' (अर्थ: यशाची कहाणी) नावाचे एक सभागृह आहे जे अभियंते आणि प्रकल्पाशी संबंधित कामगारांनी घेतलेल्या प्रचंड प्रयत्नांचा एक छोटासा घटक आहे.


महाराष्ट्रातील सर्वात मोठे कोयना धरण

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण भारतातील सर्वातज्यास्त वीजनिर्मिती करणारे आणि

महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण देखील आहे 


हे धरण पाटण तालुक्यातील कोयनानगर गावाजवळ आहे


कोयना हे धरण सातारा शहरापासून 84 किलोमीटर अंतरावर आहे

हे धरण पाटण शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर आहे


कोयना हे धरण कृष्णेची उपनदी कोयना ह्या नदीवर 

1956 ते 1964 मध्ये बांधण्यात आले 


याधरणाची उंची 103.2 मीटर म्हणजे 339 फूट तसेच 

लांबी 807.2 मीटर  म्हणजे 2648 फूट आहे 

कोयना या धरणाची पाणी साठवण्याची  एकूण क्षमता 105.26 टीएमसी 

म्हणजेच 105260 दशलक्ष घनफूट  तसेच  उपयुक्त क्षमता 100.14  टीएमसी 

म्हणजेच 100140 दशलक्ष घनफूट इतकी आहे


या धरणाला 6 दरवाजे आहेत 


या धरणाच्या जलाशयाला शिवसागर जलाशय असे म्हणातात



********************************************************************************************************************************

2 जायकवाडी धरण



नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्यातील  एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे जायकवाडी धरण


आपण महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांची यादी केल्यास जायकवाडी धरण २ ऱ्या क्रमांकावर येते 

तर महाराष्ट्रातील एकूण जलसाठा असलेल्या धरणांची यादी केल्यास हे धरण ३ ऱ्या क्रमांकावर येते


हे धरण पैठण तालुक्यातील पैठण गावाजवळ आहे


जायकवाडी हे धरण अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमेवर आहे 


जायकवाडी हे धरण औरंगाबाद शहरापासून 54 किलोमीटर अंतरावर तसेच 

हे धरण पैठण शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे


जायकवाडी हे धरण गोदावरी नदीवर बांधले आहे.


जायकवाडी धरणाचे बांधकाम 1965 ते 1976 साली झाले


या धरणाच्या जलाशयाला नाथसागर जलाशय असे म्हणतात 


जायकवाडी धरणाची उंची 41.30 मीटर म्हणजेच 135 फूट आहे

या धरणाची लांबी 9998 मीटर म्हणजेच 32802 फूट आहे 


या धरणाला 27 दरवाजे आहेत


जायकवाडी या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 102.73 टीएमसी म्हणजेच 102730 दशलक्ष घनफूट इतकी आहे


 या धरणाची पाणी साठवण्याची एकूण उपयुक्त क्षमता 76.67 टीएमसी म्हणजेच 76670 दशलक्ष घनफूट इतकी आहे


या धरणातून दोन कालवे जातात डावा आणि उजवा कळवा 


उपयुक्त जलसाठा आणि एकूण जलसाठा असलेली महाराष्ट्रातील सर्वातमोठी धरणे  अनुक्रमे 

प्रथम क्रमांकावर कोयना 100.14 टी. एम. सी 

दुसऱ्या क्रमांकावर जायकवाडी 76.67 टी. एम. सी 

आणि तिसऱ्या क्रमांकावर उजनी 53.58 टी. एम. सी 


एकूण जलसाठा असलेली महाराष्ट्रातील सर्वातमोठी धरणे  अनुक्रमे 

प्रथम क्रमांकावर उजनी 117.25 टी. एम. सी 

दुसऱ्या क्रमांकावर कोयना 105.26

आणि तिसऱ्या क्रमांकावर जायकवाडी 102.73 


उपयुक्त पाणीसाठा आणि एकूण पाणीसाठा म्हणजे 

धरणातील जेवढा पाणीसाठा प्रत्यक्ष वापरात येतो त्या पाणीसाठ्याला उपयुक्त पाणीसाठा म्हणतात आणि राहिलेला पाणी साथ आहे त्याला डेड म्हणजेच मृद पाणीसाठा म्हणतात 

उपयुक्त आणि मृद पाणीसाठा मिळून जो संपूर्ण धरणाचा पाणीसाठा होतो तो म्हणजेच एकूण पाणीसाठा 

म्हणूनच मित्रांनो धरणाने मोजमाप करताना एकूण आणि उपयुक्त साठा दोन्हीचा विचार केला जातो 


६० किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे





जायकवाडी धरणाची उंची 41.30 मीटर म्हणजेच 135 फूट आहे

या धरणाची लांबी 9998 मीटर म्हणजेच 32802 फूट आहे 


या धरणाला 27 दरवाजे आहेत

जायकवाडी या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 102.73 टीएमसी म्हणजेच 102730 दशलक्ष घनफूट 

तसेच उपयुक्त क्षमता 76.67 टीएमसी म्हणजेच 76670 दशलक्ष घनफूट इतकी आहे



********************************************************************************************************************************

3 उजनी धरण




नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे उजनी धरण सोलापूर महाराष्ट्र 



महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकूण जलसाठा असलेली धरणांच्या यादीमध्ये  117.25 टी.एम.सी पाणीसाठ्यासह उजनी धरणाचा पहिला क्रमांक येतो 


तसेच महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये  53.58 टी. एम. सी सह उजनी धरणाचा तिसरा क्रमांक येतो 


उजनी धरण सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्याच्या टेम्भूर्णी गावापासून ११ किलोमीटर अंतरावर आहे

उजनी धरण सोलापूर शहरापासून १०१ किलोमीटर अंतरावर असून पुणे शहरापासून १५५ किलोमीटर अंतरावर आहे 


हे धरण इंदापूर शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर असून


उजनी धरण पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर कृष्णेची उपनदी भिमा या नदीवर 1969 ते 1980 साली बांधन्यात आले

या धरणाच्या जागेचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते.


उजनी याधरणाची उंची 56.4 मीटर  म्हणजे 185 फूट आहे 

या धरणाची लांबी 2532 मीटर  म्हणजे 8314 फूट आहे 

उजनी या धरणाची पाणी साठवण्याची  एकूण क्षमता 117.25 टीएमसी 

म्हणजेच 117250 दशलक्ष घनफूट इतकी आहे


उजनी या धरणाची पाणी साठवण्याची उपयुक्त क्षमता 53.58  टीएमसी 

म्हणजेच 53580 दशलक्ष घनफूट इतकी आहे


या धरणाला 41 दरवाजे आहेत 


या धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर जलाशय असे म्हणातात

उजनी याधरणावर 12 मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते


तुम्हाला फ्लेमिंगो या परदेशी पक्षाचे निरीक्षण करायचे असेल तर हा पक्षी हिवाळ्यात या जलाशयावर येतो. या धरणाचा फुगवटा हा खूप मोठा आहे. जवळपास दौंड पर्यंत हा पसरलेला आहे. या उजनी जलाशयाच्या पाणी साठ्याच्या आत तुम्हाला पळसनाथ हे मंदिर जेवहा पाणीसाठा कमी होईल तेव्हा बघायला मिळेल. 


पळसदेव मंदिर यादवकालीन आहे. या ठिकाणी पक्क्या विटांनी बांधलेली शिखरे पाहता येतात. मंदिर आवारात सतीशिळा, वीरगळ, भंगलेला घोडा, मारुतीची मूर्ती, दीपमाळेचे अवशेष्भक्कम विटांची भग्न ओवरी असे अनेक गोष्टी धरणातील पाणी कमी झाल्यावर पाहायला मिळतात.


या धरणात मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो 


उजनी धरण इतके मोठे आहे, की ते बांधताना 29 गावे पाण्याखाली गेली होती. धरणातील पाण्याचा पुणे,सोलापूर आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांतील शेतीला भरपूर फायदा होत आहे.


या धरणातून २ कालवे जातात यामधी डावा कालवा १२६ किलोमीटर पर्यंत जातो तर दुसरा उजवा कालवा ११२ किलोमीटर पर्यंत वाहत जातो




********************************************************************************************************************************

4 तोतलाडोह धरण



नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे तोतलाडोह धरण


महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकूण जलसाठा असलेली धरणांच्या यादीमध्ये  41.21 टी.एम.सी पाणीसाठ्यासह तोतलाडोह धरणाचा पाचव्या क्रमांक येतो


तसेच महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये  35.91 टी. एम. सी सह तोतलाडोह धरणाचा चौथ्या क्रमांक येतो 


तोतलाडोह धरण नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात रामटेक पासून 38 किलोमीटर अंतरावर असून

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ह्या दोन राज्यांच्या सीमेवर आहे 

*

तोतलाडोह धरण नागपूर शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर आहे 



नागपूर जिल्ह्यातील पेंच नदीवर तोतलाडोह धरण १९८९ साली बांधण्यात आले



तोतलाडोह याधरणाची उंची 74.5 मीटर  म्हणजे 244 फूट आहे 

या धरणाची लांबी 680 मीटर  म्हणजे 2230 फूट आहे 

तोतलाडोह या धरणाची पाणी साठवण्याची  एकूण क्षमता 41.21 टीएमसी 

म्हणजेच 41210 दशलक्ष घनफूट इतकी आहे


तोतलाडोह या धरणाची पाणी साठवण्याची उपयुक्त क्षमता 35.91 टीएमसी 

म्हणजेच 35910 दशलक्ष घनफूट इतकी आहे


या धरणाला 14 दरवाजे आहेत



तोतलाडोह याधरणावर 160 मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते


********************************************************************************************************************************

5 इसापूर धरण 




रसिकहो नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ आणि हिंगोली ह्या दोन जिल्यांच्यासीमेवर असलेले इसापूर धरण पाहणार आहोत 


महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकूण जलसाठा असलेली धरणांच्या यादीमध्ये  45.17 टी.एम.सी पाणीसाठ्यासह इसापूर धरणाचा चौथ्या क्रमांक येतो


तसेच महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये  34.04 टी. एम. सी सह इसापूर धरणाचा पाचव्या क्रमांक येतो 



इसापूर हे धरण हिंगोली शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे

तसेच हे धरण यवतमाळ शहरापासून १३६ किलोमीटर अंतरावर आणि 

नांदेड शहरापासून ८८ किलोमीटर अंतरावर आहे

इसापूर हे धरण पैनगंगा नदीवर 1971 ते 1982 साली बांधण्यात आले 


पैनगंगा हि नदी वर्धा नदीची उपनदी आहे, वर्धा वैनगंगेला मिळते या प्रवाहास प्राणहिता म्हणतात प्राणहिता ही पुढे गोदावरीला मिळते


इसापूर धरणाची उंची 57 मीटर  म्हणजेच 187 फूट आहे

या  धरणाची   लांबी  4120 मीटर  म्हणजेच 13517 फूट आहे 


इसापूर या धरणाची पाणी साठवण्याची  एकूण क्षमता 45.17 टीएमसी 

म्हणजेच 45170 दशलक्ष घनफूट इतकी आहे


इसापूर या धरणाची पाणी साठवण्याची उपयुक्त क्षमता 34.04 टीएमसी 

म्हणजेच 34040 दशलक्ष घनफूट इतकी आहे



इसापूर धरणाला 15 दरवाजे आहेत 


इसापूर धरणातून २ कलवे  जातात या दोन कालव्याचा हिंगोली यवतमाळ आणि नांदेड ह्या ३ जिल्ह्यांना फायदा होतो 



Comments

Popular posts from this blog

भारतातील आणि जगातील धरणे

******   भारतातील आणि जगातील धरणे    ******** जगातील   सर्वात   मोठी ५    धरणे (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)  जगातील   सर्वात   मोठे   धरण   करिबा   (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)  भारतातील सर्वात मोठी ५ धरणे (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)           इंदिरा   सागर   धरण                                  सरदार   सरोवर   धरण                                   रिहंद   धरण                              भाख्रा   नागल   धरण                                नागार्जुन सागर धरण   इडुक्की   धरण (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)                                    महाराष्ट्र सर्वात मोठी 5 धरणे (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)  कोयना   धरण                   उजनी   धरण                   जायकवाडी   धरण           तोतलाडोह धरण                ईसापूर   धरण घोसेखुर्द   धरण पुणे जिल्यातील २८ धरणे      पुणे   जिल्ह्याती    धरणे    फुल्ल           पुणे   जिल्ह्याती   धरणे भाग २           पुणे   जिल्ह्याती धरण भाग   १      ——————————— पुणे   ध

भारतातील सर्वात उंच 6 धरणे

             भारतातील सर्वात उंच 6 धरणे Click here for 👉 youtube video नमस्कार मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात उंच 6 धरणे पाहणार आहोत    6 श्रीशैलम धरण 6 श्रीशैलम धरण भारतातील सर्वात उंच धरणांच्या यादी मध्ये सहाव्या क्रमांकाचे धरण आहे श्रीशैलम   हे धरण आंध्र प्रदेश राज्यातील कर्नुल जिल्ह्यात आहे भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांच्या यादीमध्ये  श्रीशैलम धरणाचा  3 रा क्रमाला येतो  हे धरण तेलंगणा आणि आंध्रप्रदेश ह्या दोन राज्यांचा सीमेवर आहे श्रीशैलम धरण कृष्णा  ह्या नदीवर 1960 ते 1981 साली बांधण्यात आलेले आहे याधरणाची उंची 145.10 मीटर  म्हणजे 476 फूट आहे  या धरणाची लांबी 512 मीटर  म्हणजे 1680 फूट आहे  श्रीशैलम या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 308 टीएम सी असून हे भारतातील ६ व्या क्रमांकाचे सर्वात ज्यास्त  पाणीसाठा असलेले धरण आहे  श्रीशैलम याधरणावर 1670 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 4 थ्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे  श्रीशैलम मल्लिकार्जुन हे १२ ज्योतिर्लिंग मधील २ रे ज्योतिर्लिंग आहे  तसेच ह्याठिकाणाचे अ

सीदोजी राजेनिंबाळकरांचा गुमठ वडगाव निंबाळकर

 बारामती मधील छत्रपती राजाराम महाराज यांचा महाराष्ट्रातील प्रथम शिलालेख  तसेच औरंगजेब बादशहा वडगाव निंबाळकर शाखा नवीन वंशावळ  वडगाव निंबाळकर समाधी लेख   हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील बारामती  तालुक्यातील (कोऱ्हाळे  ) जवळ असलेल्या  मौजे वडगाव निंबाळकर  गावातील  गावाच्या वस्ती  बाहेर असलेल्या एका वैयक्तिक निंबाळकर घराण्याच्या शेताच्या बांधावर असलेल्या घुमटाच्या समाधी वर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला कोरलेला आहे .घुमटाचा आकार भव्य मोठा असून त्यावर चोहो बाजूने नक्षी काम केलेले आहे गाभाऱ्यात  शिवपिंडी असून आतमध्ये काही देवकोष्ठ कोरलेली आहेत .शिलालेख खोदीव स्वरूपाचा असून ३५ ओळीचा पुरवणी सह दोन भागात विभागाला गेला असून शुद्ध मराठी भाषेत आहेत काळाच्या ओघात शिलालेखाची अक्षरे झिजलेली असून पुसट झालेली आहेत.  गावाचे  नाव : वडगाव निंबाळकर   ता.बारामती  , जि. पुणे   शिलालेख वाचन  शके १६१५ श्रीमुख नाम संवछरे मार्गेश्वर शु  घ प्रतिपदेस गुमठ समाप्त. विठोजी राजे निंबाळकर.  मोकादम मौजे वडगाव त्या ची स्त्री रखमाआवा(बाई) त्या  चे पुत्र संताजीराजे त्या  ची स्त्री गुणाआवा(बाई) त्याचे पुत्र सिदोजीराजे त्या ची