Search This Blog

Friday, 20 May 2022

महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधबे अर्थात वॉटरफॉल

महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधबे अर्थात वॉटरफॉल



नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधबे अर्थात वॉटरफॉल 

20

महाराष्ट्रातील प्रसिद्ध आंबोली  धबधबा 

हा धबधबा सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आंबोली घाटात आहे

 


19

महाराष्ट्रातील प्रसिद्ध अजंठा लेणी धबधबा 

हा धबधबा औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अजंठा लेणी जवळ आहे

हा परिसर पावसाळ्यात अतिशय विहंगम दिसतो 


18

महाराष्ट्रातील प्रसिद्ध वाघोरा धबधबा

हा धबधबा औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद  तालुक्यातील वेरूळ लेणी जवळ आहे

हा धबधबा वेरूळ च्या २७ नंबर च्या लेणी शेजारी वेळगंगा या नदीवर आहे 


17

महाराष्ट्रातील एक  प्रसिद्ध मळवली धबधबा 

हा धबधबा पुणे जिल्ह्यातील  मावळ तालुक्यातील मळवली गावाजवळ आहे

हा धबधबा माळवली रेल्वे स्टेशन पासून जवळच आहे आणि लोहगड विसापूर हे दोन किल्ले ह्या धबधबा जवळच आहेत 


16

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवकुंड धबधबा 

हा धबधबा पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे 

हा धबधबा भिरा धरण शेजारी ताम्हिणी घाटात आहे 



15

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धबधबा रामतीर्थ धबधबा 

रामतीर्थ हा धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील आजरा गावाजवळ आहे


14

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध विहिगाव धबधबा / अशोका धबधबा (इगतपुरी जवळ) 

हा धबधबा ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील विहिगाव या गावाजवळ आहे 

ह्या धबधब्याची साधारण उंची 120 फूट आहे


13

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धबधबा रंधा धबधबा (भंडारदरा जवळ)

हा धबधबा अहमदनगर जिल्ह्यातील  अकोले तालुक्यातील रानाड बुद्रुक गावाशेजारी आहे 

ह्या धबधब्याची साधारण उंची 170 फूट आहे

हा धबधबा भंडारदरा धरणापासून पुढे प्रवरा नदीवर आहे 



12

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धबधबा दाभोसा धबधबा 

हा धबधबा पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील दाभोसा गावाजवळ आहे 

ह्या धबधब्याची साधारण उंची 300 फूट आहे


11

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धबधबा सोमेश्वर / दूधसागर धबधबा

हा धबधबा नाशिक जिल्ह्यातील  नाशिक तालुक्यातील शेजारी आहे 

ह्या धबधब्याची साधारण उंची 32 फूट आहे


10

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धबधबा सावतसडा धबधबा (चिपळूण जवळ)

हा धबधबा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील चिपळूण शेजारी आहे 






9

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पांडवकडा धबधबा 

पांडवकडा हा धबधबा नवी मुंबई जिल्ह्यात पनवेल तालुक्यात आहे 

ह्या धबधब्याची साधारण उंची 351 फूट आहे


8

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धबधबा दुगार वाडी धबधबा

हा धबधबा नाशिक  जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील त्र्यंबक गावाजवळ आहे 

ह्या धबधब्याची साधारण उंची 450 फूट आहे



7

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध चाइना मेन धबधबा (महाबळेश्वर)

हा धबधबा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर गावाजवळ आहे 

ह्या धबधब्याची साधारण उंची 500 फूट आहे 

हा धबधबा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून कोकण बाजूला कोसळतो 



6

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध अंब्रेला फॉल्स (भंडारदरा जवळ) 500

हा धबधबा जिल्ह्यातील  तालुक्यातील शेजारी आहे 

ह्या धबधब्याची साधारण उंची 500 फूट आहे


5

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध लिंगमाळा धबधबा (महाबळेश्वर जवळ) 600

हा धबधबा सातारा जिल्ह्यातील  महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर शेजारी आहे 

ह्या धबधब्याची साधारण उंची 600 फूट आहे



4

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कुणे फॉल्स (लोणावळ्याजवळ)

हा धबधबा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुणे गावाशेजारी आहे 

ह्या धबधब्याची साधारण उंची  660 फूट आहे




3

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धबधबा मार्लेश्वर (धारेश्वर) धबधबा मंदिर (रत्नागिरी जवळ)

हा धबधबा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील आंबाव गावाजवळ आहे 

ह्या धबधब्याची साधारण उंची 994 फूट आहे 

हा धबधबा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून कोकण बाजूला कोसळतो 

ह्या  धबधब्या मधून बाव ह्या नदीचा उगम होतो. येथे मार्लेश्वराचे मंदिर आहे. हा परिसर पावसाळ्यात अतिशय सुंदर दिसतो 


2

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ठोसेघर धबधबा (सातारा जवळ)

हा धबधबा सातारा जिल्ह्यातील  सातारा  तालुक्यातील चाळकेवाडी शेजारी आहे 

ह्या धबधब्याची साधारण उंची 1600 फूट आहे


1

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध वजराई धबधबा (सातारा जवळ)

हा धबधबा सातारा जिल्ह्यातील  सातारा  तालुक्यातील कासपठार शेजारी आहे 

ह्या धबधब्याची साधारण उंची 1840 फूट आहे








पुरंदर किल्ला

पुरंदर किल्ला 

स्वराज्यातील एक महत्वाचा किल्ला म्हणजेच पुरंदर किल्ला 

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणजेच पुरंदर किल्ला 


पुरंदर हा किल्ला पुणे शहरापासून 41 किलोमीटर अंतरावर तसेच हा किल्ला सासवड ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे


पुरंदर ह्या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे या किल्यावर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा  जन्म झाला होता


सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत.


त्यापैकी एक फाटा २४ किलोमीटर अंतरावर भुलेश्वर पर्यंत बसलेला आहे 

त्याच फाट्यावर  सिंहगड, पुरंदर, वज्रगड वसलेले आहेत


पुरंदर किल्यावर पुण्याहून जाण्यासाठी कात्रज, बापदेव, आणि दिवे या घाटातून पुरंदरच्या पायथ्याशी जात येते 

किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. 


पुरंदरच्या वायव्येला 42  किलोमीटर अंतरावर सिंहगड किल्ला तसेच पश्चिमेला 54 किलोमीटर अंतरावर   राजगड आणि 60 किलोमीटर अंतराव तोरणा किल्ला हे किल्ले आहेत.


पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबन्दी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.


हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही चा सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बन्दोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकण्ठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. १४ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला. छत्रपती संभाजी महाराजांनी नखशिखांत, नायिकाभेद, सातशतक व बुधभूषण हे ग्रन्थ लिहिले. 

पुरंदरचा तह

सन १६६५ मध्ये मोगल सरदार मिर्झाराजा जयसिंहने पुरंदरला वेढा घातला.

दिलेरखानाने वज्रगड ताब्यात घेतला तसेच पुरंदरावर हल्ला केला आणि पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडले आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंहाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहासप्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे अशी,



८ मार्च १६७० मध्ये निळोपन्त मुजुमदाराने किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी राजांच्या मृत्यूनन्तर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव 'आजमगड' ठेवले. 

पुढे मराठ्यांच्या वतीने शंकराजी नारायण सचिवांनी मोगलांशी भांडून पुरंदर घेतला.. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

बिनी दरवाजा: पुरंदर माचीवरील हा एकमेव दरवाजा. 

पुरंदरेश्वर मन्दिर: हे मन्दिर महादेवाचे आहे. 

रामेश्वर मन्दिर: पुरंदरेश्वर मन्दिराच्या मागील कोपर्‍यात पेशवे वंशाचे रामेश्वर मन्दिर आहे.

दिल्ली दरवाजा: हा उत्तराभिमुख दरवाजा आहे

खन्दकडा: दिल्ली दरवज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो. हाच तो खन्दकडा. 

पद्मावती तळे: मुरारबाजींच्या पुतळ्यापासून पुढे गेल्यावर पद्मावती तळे लागते.

शेन्दर्‍या बुरूज: पद्मावती तळ्याच्या मागे बालेकिल्ल्याच्या वायव्येस, तटबन्दीच्या बरोबरीने एक बुरूज बान्धला आहे. त्याचे नाव शेन्दर्‍या बुरूज.

केदारेश्‍वर: केदार दरवाजा पाहून मूळ वाटेने १५ मिनिटे चालून गेल्यावर काही पायर्‍या लागतात. त्या आपल्याला थेट केदारेश्‍वर मन्दिरापर्यंत घेऊन जातात. पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्‍वर. 

पुरंदर माची: आल्या वाटेने माघारी फिरून दिल्ली दरवाज्यातून जाणार्‍या वाटेने थेट पुढे यावे म्हणजे आपण माचीवरील भैरवखिण्डीत जाऊन पोहोचतो. वाटेत वाड्याचे अनेक अवशेष दिसतात.

भैरवगड: याच खिण्डीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. खिण्डीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या खिण्डीपर्यन्त गाडी रस्ता आलेला असल्याने त्या रस्त्यावरून गेल्यावर वाटेतच उजवीकडे राजाळे तलाव लागतो. पुरंदरमाचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते.

वीर मुरारबाजी: बिनी दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे गेल्यावर समोरच मुरारबाजीचा पुतळा दिसतो. इ.स. १९७० मध्ये हा पुतळा उभा केला आहे.

गडावर जाण्याच्या वाटा

  • सासवड वरून नारायणपूर मार्गे गडावर जातायेते

  • पुणे सातारा हायवे वरील कापूरहोळ गावातून २० किलोमीटर अंतरावर पुरंदर किल्ला आहे 

येथे जाताना कोणतेही ओळखपत्र घेऊन जावे (आधार ,पॅन पत्र, मतदान ओळखपत्र इत्यादी)



>छत्रपती शिवाजी महाराज: एक परस्परसंवादी गाथा

छत्रपती शिवाजी महाराज: एक परस्परसंवादी गाथा ...