जायकवाडी धरण
नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्यातील एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे जायकवाडी धरण
आपण महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांची यादी केल्यास जायकवाडी धरण २ ऱ्या क्रमांकावर येते
तर महाराष्ट्रातील एकूण जलसाठा असलेल्या धरणांची यादी केल्यास हे धरण ३ ऱ्या क्रमांकावर येते
हे धरण पैठण तालुक्यातील पैठण गावाजवळ आहे
जायकवाडी हे धरण अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमेवर आहे
जायकवाडी हे धरण औरंगाबाद शहरापासून 54 किलोमीटर अंतरावर तसेच
हे धरण पैठण शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे
जायकवाडी हे धरण गोदावरी नदीवर बांधले आहे.
जायकवाडी धरणाचे बांधकाम 1965 ते 1976 साली झाले
या धरणाच्या जलाशयाला नाथसागर जलाशय असे म्हणतात
जायकवाडी धरणाची उंची 41.30 मीटर म्हणजेच 135 फूट आहे
या धरणाची लांबी 9998 मीटर म्हणजेच 32802 फूट आहे
या धरणाला 27 दरवाजे आहेत
जायकवाडी या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 102.73 टीएमसी म्हणजेच 102730 दशलक्ष घनफूट इतकी आहे
या धरणाची पाणी साठवण्याची एकूण उपयुक्त क्षमता 76.67 टीएमसी म्हणजेच 76670 दशलक्ष घनफूट इतकी आहे
या धरणातून दोन कालवे जातात डावा आणि उजवा कळवा
उपयुक्त जलसाठा आणि एकूण जलसाठा असलेली महाराष्ट्रातील सर्वातमोठी धरणे अनुक्रमे
प्रथम क्रमांकावर कोयना 100.14 टी. एम. सी
दुसऱ्या क्रमांकावर जायकवाडी 76.67 टी. एम. सी
आणि तिसऱ्या क्रमांकावर उजनी 53.58 टी. एम. सी
एकूण जलसाठा असलेली महाराष्ट्रातील सर्वातमोठी धरणे अनुक्रमे
प्रथम क्रमांकावर उजनी 117.25 टी. एम. सी
दुसऱ्या क्रमांकावर कोयना 105.26
आणि तिसऱ्या क्रमांकावर जायकवाडी 102.73
उपयुक्त पाणीसाठा आणि एकूण पाणीसाठा म्हणजे
धरणातील जेवढा पाणीसाठा प्रत्यक्ष वापरात येतो त्या पाणीसाठ्याला उपयुक्त पाणीसाठा म्हणतात आणि राहिलेला पाणी साथ आहे त्याला डेड म्हणजेच मृद पाणीसाठा म्हणतात
उपयुक्त आणि मृद पाणीसाठा मिळून जो संपूर्ण धरणाचा पाणीसाठा होतो तो म्हणजेच एकूण पाणीसाठा
म्हणूनच मित्रांनो धरणाने मोजमाप करताना एकूण आणि उपयुक्त साठा दोन्हीचा विचार केला जातो
६० किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे
Comments
Post a Comment